निष्पाप बळी


या आरक्षणाच्या नादापायी
कित्येक निष्पाप बळी गेले।
मतीमंद आहेत हे पुढारी
पाहुन यांनी डोंळे बंद केले।
अजुन किती आत्महत्या
पाहणार हे उघड्या डोळ्यांनी।
सर्वसामान्यांचा जिव घुटतोय
गळ्यात फास घेतो स्वतःच्या हातांनी।
वरुन हलतात सुत्र सारे
यांच्या काही हातात नाही।
परदेशी दौरे यांचे यांना
आपल्याकडे पहायला वेळ नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments