लबाडांची टोळी

कधी हा तर कधी
तो पक्ष सत्तेवर असतो।
सत्ता निसटताच हातातुन
विरोधी बाक इमानदार दिसतो।
एकमेकांना टोमणे मारण्यात
हे सारेच लय पटाईत असतात।
कोणता जाहिरनामा सादर केला
जनतेसमोर सत्तेवर बसताच विसरून जातात।
ना यांचा जाहिनामा ना कोणती
यांची बात खरी आहे।
राजकारणी नेते म्हणजे
एक लबाडांची टोळी आहे।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments