डिजीटल इंडिया ठरतोय प्राणघाती


डिजीटल इंडिया मुळे होतोय
गोरगरिबांवर प्राणघाती हल्ला।
फसव्या साऱ्या बातम्या यांच्या
कोण सांगून जातो खरा सल्ला।
सोशल मिडियावर आता
नाही कोणाचे येथे नियंत्रण।
डिजिटल इंडिया धोरणामुळे
घरबसल्या माराला आमंत्रण।
नको तो सुधारित भारत आम्हाला
पहिलेच दिवस चांगले होते।
विकास मातीत जाऊद्या पण...
ते फसव्या बातम्यांचे युग नव्हते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments