सामोरं त्या दुष्काळाला


चालली हो दिवाळी ही
दिवाळं काढुन सगळ्यांची।
चर्चा समाप्त त्या सणाची
चर्चा आता निवडणुकीची।
ना सण ना कोणता रिवाज
परवडतो या सर्वसामान्याला।
वर्षामागुन चाललीत येथे
जावं लागतं सामोरं त्या दुष्काळाला।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments