घोटाळा कोंबड्याचा...
घोटाळे मागुन घोटाळे गेले
आता कोंबड्याचे ते झाले।
गरीबाले ते साधं चिकनं अन्
मोठ्या लोकांनी कडकनाथ संपवले।
काय खावं आणि किती
कोटीचे यांनी कोंबडे खाल्ले।
भ्रष्टाचाराचे मुळ ते कायम
ते काही संपत नाही।
किड ती लागलेली अन्
विकासाची दोरी ती वाढतं नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment